सनातन परंपरेत भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला ‘अजा एकादशी’ म्हणून ओळखले जाते. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असून अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी श्रद्धेने अजा एकादशीचा उपवास करणे, भगवान विष्णूंचे स्मरण करणे, त्यांचे नामस्मरण करणे आणि गरजूंना मदत करणे यामुळे पुण्य लाभते, तसेच आयुष्यात सुख, शांती आणि आत्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.
अजा एकादशीचे धार्मिक महत्त्व
भगवान विष्णूंना विश्वाचे पालन करणारे देव मानले जाते. ते आपल्या भक्तांवर कृपा करतात आणि त्यांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. विष्णू देवाच्या पूजेसाठी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी खऱ्या भक्तीने केलेला उपवास, पूजा आणि दानधर्मामुळे माणूस सांसारिक मोहातून बाहेर पडतो आणि ईश्वरभक्तीच्या जवळ पोहोचतो.
श्रीमद भागवत गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात :
“जो कोणी मला अतिशय श्रद्धेने आणि शुद्ध अंतःकरणाने एक पान, फूल, फळ किंवा थोडे पाणीदेखील अर्पण करतो, मी त्या भेटीचा आनंदाने स्वीकार करतो.”
दान आणि सेवा
सनातन संस्कृतीत पूजा आणि उपवासासोबतच दान आणि सेवेला खूप मोठे स्थान दिले गेले आहे. हिंदू परंपरेनुसार, गरजू आणि दुःखी लोकांच्या आयुष्यात आनंद आणणे आणि त्यांना आधार देणे ही सुद्धा एका प्रकारे ईश्वराचीच सेवा आहे.
गोस्वामी तुलसीदासजी यांनी म्हटले आहे :
“जसे पक्षांनी पाणी प्यायल्याने नदीतील पाणी कधी कमी होत नाही, तसेच श्रीरामांच्या कृपेने दानधर्म केल्याने माणसाची संपत्ती कधीही कमी होत नाही.”
गरीब, असहाय्य आणि दिव्यांग बालकांना अन्नदान करा
अजा एकादशीच्या या अतिशय पवित्र प्रसंगी ‘नारायण सेवा संस्थान’तर्फे गरीब, असहाय्य आणि दिव्यांग बालकांसाठी अन्नदानाचा उपक्रम आयोजित केला जात आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या भक्तीला सेवेची जोड देऊन एका गरजू बालकाला पौष्टिक आणि पोटभर जेवण देण्यासाठी आपले मोलाचे योगदान देऊ शकता.
या पवित्र अजा एकादशीला भगवान विष्णूंचे स्मरण करा, त्यांच्या नामाचा जप करा, श्रद्धेने व्रत आणि पूजा करा आणि इतरांच्या सेवेसाठी एक छोटासा संकल्प करा. तुमची छोटीशी मदतही गरजू व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाची एक छोटीशी किरण आणू शकतो.